पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हैद्राबाद मुक्तिसंग्राम एक ज्वलंत इतिहास भाग -२

इमेज
हैद्राबाद मुक्तिसंग्रामात अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांच्या त्यागाने रक्ताने लिहिला गेला आहे. आबालवृद्ध महिला, तरूण, या सर्वांनी स्वांतत्र्याच्या या अग्निकुंडात स्वत:ला झोकून दिले होते. आपली भारतमाता निजाम राजवटीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जो तो स्वत:चे प्राण अर्पण करायला समोर येत होता. हा सा-या निझाम राजवटीत क्रांती चा वणवा पसरला होता. निजामशाही तील प्रत्येक जन देशासाठी काहीही करायला सिध्द झाला होता. हैद्राबाद संस्थानातील अनेक खेड्या पर्यंत या क्रांतीचे लोण पसरले होते.  नाईचाकूर येथे स्वातंत्र्याच्या विचारणे भारावलेली माणसं होती. नेहमी स्वातंत्र्याची खलबत व्हायची. यासाठी वातावरण पोषक करण्यासाठी आर्य समाजाचे प्रमुख शामलालजी, सदाविजय आर्य यांच्या धाडसी कृत्यांमुळे भारावून गेलेले युवक या स्वातंत्र्य संग्रामात हिरीरीने सहभागी होऊ लागले. यामध्ये राम बापू पवार, माणिक कारभारी, बळीराम कारभारी आदी जेष्ठ मंडळीचा सहभाग होता.   याच वेळी गोविंदराव पवार, शाहूराज जाधव हे क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सहवासात राहून आले होते. गावातील ५०-६० युवकांला स्वातंत्र्य सं...

*हैद्राबाद मुक्तिसंग्राम एक ज्वलंत इतिहास*

इमेज
                     भाग - १ १५ ऑगस्ट १ ९ ४७ भारतात स्वातंत्र्याची पहाट झाली . पण हैद्राबाद संस्थान अजुनही पारतंत्र्याच्या अंधकारात होते . येथील निजामशाही १७२४ ते १ ९ ४८ पर्यंत म्हणजे जवळपास २२५ वर्षे जनतेचा हुकुमशाही पद्धतीने छळ करीत होती . हैद्राबादचा शेवटचा निजाम होता . मीर उस्मान अली खाँ बहादूर . दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीश साम्राज्य दुर्बळ झाले होते . देशांतर्गत सैन्याची बंडखोरी , जागतिक वातावरण , क्रांतीकारी चळवळीमुळे इंग्रजांना भारतात आपले राज्य टिकवणे अशक्य वाटू लागले होते . भारताची फाळणी करण्याचे व संस्थानांना स्वातंत्र्य देण्याचे इंग्रजी धोरण पाहुन शेवटचा निजाम उस्मान अलीला दक्षिणेत स्वतंत्र राज्य उभे करण्याची स्वप्ने पडू लागली होती . पण शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नाने हैद्राबाद संस्थान दि . १७ सप्टेंबर १ ९ ४८ ला स्वतंत्र झाले .या लढ्याची कहाणी अतिशय रोमांचकारी आहे .       हैद्राबाद संस्थानात मराठवाडा , तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या भागांचा समाव...