पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुलांनो तुमच्यासाठी.......

करोना विषाणू संसर्गामुळे शाळांना सुट्टया  लागल्याने पालकांनी ही याची काळजी घेऊन मुलांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. मुल घराबाहेर  म्हणजे समुहात खेळायला जाणे होते. यातून संसर्गजन्य स्थिती उदभवू नये.  मुलं दिवस भर घरात थांबून कंटाळवाणे होत असेल.   सुट्टीच्या कालावधीत नेहमी शिबिरे, विविध छंद वर्ग, शिबिरे, सहपरिवार सहली, संग्रहालये, प्रेक्षणीय ठिकाणे मुलांना दाखवणे असे नियोजन पालक करत असतील पण करोनाच्या संसर्गामुळे हे सर्व बंद केले. घराच्या बाहेर जायचे नाही म्हणून काय झाले आम्ही घरीच मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी अनेक कार्यक्रम/उपक्रम करून घेऊयात.   मुलांकडून अवांतर वाचन करून घेता येईल. तोचतोचपणा घालवण्यासाठी नेटवर मुबलक साहित्य  पीडीएफ च्या रूपात उपलब्ध आहे. अनेक गाजलेल्या कांदब-या, गूढकथा, प्रवास वर्णने, आत्मचरित्र, युद्ध कथा, तसेच अनुवादित साहित्य इ. प्रतिभावान लेखकांच्या  साहित्यांचा आस्वाद वाचकांना घेता येईल. छात्रप्रबोधन मासिकांचे दर्जेदार जुने अंक ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.   दररोज काही तरी लिहावे. आपले अनुभव...

२३ मार्च....!!! आज शहीद दिवस

इमेज
भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या जहाल क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या वेळी त्यांच्यासमवेत कटामध्ये सामील असलेले शिवकर्मा, जयदेव कपूर आणि अन्य सहकारी यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जन्मठेप झालेल्या या मंडळींना ती शिक्षा भोगण्यासाठी दुसर्‍या कारागृहात नेण्यात येणार होते. तेव्हा कारागृहातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांची शेवटची भेट घेण्याची त्यांना अनुमती दिली. त्या भेटीत जयदेव कपूर यांनी भगतसिंगांना विचारले, ‘‘तुम्हाला फाशी देण्याचे ठरले आहे. अशा वेळी, ऐन तारुण्यात, मृत्यूला सामोरे जातांना तुम्हाला वाईट वाटत नाही का ?’’ तेव्हा भगतसिंग हसून म्हणाले, ‘‘अरे ! माझ्या प्राणांच्या बदल्यात ‘इन्कलाब झिंदाबाद’ ही घोषणा हिंदुस्थानच्या कानाकोपर्‍यात पोहोचवण्यात मी यशस्वी झालो आहे आणि हेच मी माझ्या प्राणांचे मूल्य समजतो. आज गजाआड असलेल्या माझ्या लक्षावधी बांधवांच्या तोंडून मी हीच घोषणा ऐकत आहे. इतक्या लहान वयात याहून अधिक मूल्य कोणते असू शकते ?’’ त्यांच्या तेजस्वी वाणीने सर्वांचेच डोळे पाणावले. त्यांनी कसेबसे हुंदके आवरले. तेव्हा त्यांच...

जनकल्याण निवासी विद्यालयाचे संगीत परिक्षेत घवघवीत यश

इमेज
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेमध्ये जनकल्याण निवासी विद्यालयातील १३३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.   प्रारंभिक परिक्षेत ११ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर प्रवेशिका प्रथम परिक्षेत २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रवेशिका पुर्ण परिक्षेत १विशेष प्राविण्यासह तर प्रथम श्रेणीत४१तर १७ विद्यार्थी द्वितीय  श्रेणीत उत्तीर्ण झाले.या विद्यार्थ्यांना हनुमंत पांचाळ सर यांनी शिक्षण दिले.  या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाच्या वतीने प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचूरकर, प्रकल्प कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशराव सेलूकर,वसतीगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे ,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के , प्रशासकीय अधिकारी  रविंद्र पुर्णपात्रे,अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी,शिक्षक,पर्यवेक्षक यांनी केले.