पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिंदुनृपती श्री शाहूछत्रपती

इमेज
अखंड हिंदुस्थानचे  हिंदुपदपातशाह, हिंदवी स्वराज्याचे हिंदवी साम्राज्यात रुपांतर करणारे छत्रपती शाहू महाराज! छ.शंभुराजांचे सुपुत्र  शाहूंचा जन्म  महाराणी येसूबाई यांच्या पोटी १८ मे १६८२ रोजी रायगड जिल्ह्यातील गांगवली येथे  झाला. त्यांचे मूळ नाव "शिवाजी" असेच होते.  त्यांचे बालपण रायगड किल्ल्यावर फुलत होते. मुगल बादशाह औरंगजेब आपल्या प्रचंड सैन्यानिशी दक्षिणेत आला. दक्षिणेतील हिंदवी स्वराज्य नष्ट करण्याचा त्याचा हेतू होता.हिंदुंचे स्वराज्य जिंकण्यासाठी आपल्या सर्वशक्तीनिशी  औरंगजेब स्वराज्यातील किल्ले ताब्यात घेण्यासाठी धडपडत होता. औरंगजेबाशी मोठ्या आत्मविश्वासाने छत्रपती शंभुराजे संघर्ष करत होते.पण फितुरीने ते संगमेश्वर येथे मुघलांच्या हाती लागले.  शेख निजाम उर्फ मुकर्रबखान याने संगमेश्वरावर छापा घालुन शंभुराजांना कैद केले. छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत  हालहाल करुन  औरंगजेबाने हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर झुल्फिकारखान उर्फ इतिकादखान याने रायगडाला वेढा दिला होता.अखेर   महाराणी येसूबाई यांना राजपुत्र बाल शाहू यांच्...

हैद्राबाद मुक्तिसंग्राम एक ज्वलंत इतिहास भाग -२

इमेज
हैद्राबाद मुक्तिसंग्रामात अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांच्या त्यागाने रक्ताने लिहिला गेला आहे. आबालवृद्ध महिला, तरूण, या सर्वांनी स्वांतत्र्याच्या या अग्निकुंडात स्वत:ला झोकून दिले होते. आपली भारतमाता निजाम राजवटीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जो तो स्वत:चे प्राण अर्पण करायला समोर येत होता. हा सा-या निझाम राजवटीत क्रांती चा वणवा पसरला होता. निजामशाही तील प्रत्येक जन देशासाठी काहीही करायला सिध्द झाला होता. हैद्राबाद संस्थानातील अनेक खेड्या पर्यंत या क्रांतीचे लोण पसरले होते.  नाईचाकूर येथे स्वातंत्र्याच्या विचारणे भारावलेली माणसं होती. नेहमी स्वातंत्र्याची खलबत व्हायची. यासाठी वातावरण पोषक करण्यासाठी आर्य समाजाचे प्रमुख शामलालजी, सदाविजय आर्य यांच्या धाडसी कृत्यांमुळे भारावून गेलेले युवक या स्वातंत्र्य संग्रामात हिरीरीने सहभागी होऊ लागले. यामध्ये राम बापू पवार, माणिक कारभारी, बळीराम कारभारी आदी जेष्ठ मंडळीचा सहभाग होता.   याच वेळी गोविंदराव पवार, शाहूराज जाधव हे क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सहवासात राहून आले होते. गावातील ५०-६० युवकांला स्वातंत्र्य सं...

*हैद्राबाद मुक्तिसंग्राम एक ज्वलंत इतिहास*

इमेज
                     भाग - १ १५ ऑगस्ट १ ९ ४७ भारतात स्वातंत्र्याची पहाट झाली . पण हैद्राबाद संस्थान अजुनही पारतंत्र्याच्या अंधकारात होते . येथील निजामशाही १७२४ ते १ ९ ४८ पर्यंत म्हणजे जवळपास २२५ वर्षे जनतेचा हुकुमशाही पद्धतीने छळ करीत होती . हैद्राबादचा शेवटचा निजाम होता . मीर उस्मान अली खाँ बहादूर . दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीश साम्राज्य दुर्बळ झाले होते . देशांतर्गत सैन्याची बंडखोरी , जागतिक वातावरण , क्रांतीकारी चळवळीमुळे इंग्रजांना भारतात आपले राज्य टिकवणे अशक्य वाटू लागले होते . भारताची फाळणी करण्याचे व संस्थानांना स्वातंत्र्य देण्याचे इंग्रजी धोरण पाहुन शेवटचा निजाम उस्मान अलीला दक्षिणेत स्वतंत्र राज्य उभे करण्याची स्वप्ने पडू लागली होती . पण शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नाने हैद्राबाद संस्थान दि . १७ सप्टेंबर १ ९ ४८ ला स्वतंत्र झाले .या लढ्याची कहाणी अतिशय रोमांचकारी आहे .       हैद्राबाद संस्थानात मराठवाडा , तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या भागांचा समाव...

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

इमेज
(संग्रहातील फोटो)  लातूर ता. २९ जुलै (जनकल्याण वृत्तसेवा) :  हरंगुळ(बु) येथील जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १००टक्के निकालाची परंपरा कायम आहे. विद्यालयातील २२ विद्यार्थ्यांना ९० टक्यांपेक्षा अधिक गुण घेतले. तर५७ विद्यार्थ्यांनी ९० ते ८० टक्के मध्ये गुण संपादन केले आहेत. या परीक्षेसाठी८५ विद्यार्थी बसले होते. यातील विशेष प्राविण्यासह सर्व ८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातून चि. अक्षय श्रीधर वरेकर याने ९७ टक्के गुण घेत प्रथम, निवृत्ती बालाजी आलगुले याने ९६.६०टक्के गुण घेत व्दितीय, तर विद्यालयातून तृतीय व मुलीमधून प्रथम साक्षी संतोष कुटे हिने ९५.६० टक्के गुण घेत पटकाविला. या विद्यार्थ्यांचे तसेच दहावी प्रमुख सौ. माधुरीताई अंतरकर, सौ. दाक्षायणी भालेकर, पर्यवेक्षक बाबासाहेब मते, गुणवंत राठोड, विद्या कुलकर्णी यांचे प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, प्रकल्प कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेश सेलूकर, वसतीगृह समिती अध्यक्ष राजेश सुगरे,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पुर्णपात्रे,अधीक्षक शर्म...

नाणेसंग्रहाचा अनोखा छंद

इमेज
 मला शालेय जीवनापासूनच नाणे जमा करण्याचा छंद आहे.  आता माझ्याकडे मोघल काळापासून आतापर्यंत चे विविध प्रकारचे ३५०पेक्षा अधिक नाणे आहेत. नाणे संग्रहात जर्मन, तांबे, लोह, चांदी, पितळ, स्टील अशा वेगवेगळ्या धातूंची नाणी आहेत.  यामध्ये मोघल, बहमनी, इंग्रज कालीन ते आताचे प्रचलित नाण्यासोबत विदेशी अमेरिकन, इंग्लंड, दुबई, नेपाळ, झांबिया देशातील काही नाणे आहेत.  यांच्याकडे  असलेल्या नाण्यामध्ये  विजयनगर साम्राज्यातील चलन, बहमनी, मोगल, निजाम, कालावधीतील नाणे तसेच इग्रंज कालावधीतील १८६२,१९०८ चे व्हिक्टोरिया राणी, १९३५, १९४३चे एबी वर्ल्ड क्लास जॉर्ज सहावा किंग सम्राट वन क्वार्टर अण्णा इंडिया ,१९०७ च्या १रूपयावर एडवर्ड सातवा किंग ,१९२५ च्या १/४ रुपयावर जॉर्ज हि किंग सम्राट बॉम्बे मिंट यांचे चेहरा चिन्हांकित केलेले नाणे तसेच १,२, अण्णा ही आहेत. या संकलनात  स्वतंत्र भारतातील   प्रचलित नाणे १,२ , ३, ५ , १०,२०,२५,५०पैसावर विविध संदेश आहेत. यामध्ये १,२,५,१० रुपयावर भारतीय राजकारणी, संत, राजे, संत, महापुरुष यांच्या जन्म शताब्दी, ७५,१२५,१५०...

खो-खो च्या राष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षणासाठी लातूरच्या १० क्रीडा मार्गदर्शकांचा सहभाग

इमेज
- महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व छत्रपती शिवाजी महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या ऑनलाईन खो-खो प्रशिक्षण दिले. ५ मे ते १३ मे या कालावधीत संपन्न झाले. भारतभरातील १०२० खो-खो मार्गदर्शकांनी सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील १० मार्गदर्शकांचा सहभाग होता. यामध्ये नामदेव गोमारे, चंद्रकांत लोदगेकर, दत्ता माने, निशिकांत सदाफुले,गणेश निकम, सौ. रत्नराणी कोळी, सौ. योगिता संदीकर, सौ.सुवर्णा डोईजोडे ,महेश सुर्यवंशी, नरेंद्र वंगाटे यांचा सहभाग होता.  या प्रशिक्षणात खो-खो खेळाचा इतिहास, आक्रमणाचे कौशल्य, संरक्षणाचे कौशल्य, मैदानाचे मोजमाप,खेळाडूंचे मानसशास्त्र, व्यायाम, आहार तसेच खेळाडूंना होणारी दुखापत या विषयावर अॅड. अरूण देशमुख, डॉ. अमित प्रभू, डॉ. नरेंद्र कुंदर,प्रविण चालक, संजय मुंढे, प्रशांत इनामदार, बिपिन पाटिल, डॉ. अमित राव्हते,डॉ.ज्योती सोळुंके,डॉ.चंद्रजित जाधव, गोविंद शर्मा,डॉ.प्रदिप देशमुख या दिग्गजांनी झुम मीटिंग व्दारे नऊ दिवस मार्गदर्शन केले.

कुत्रोबा ग्राम दैवत असणारे नाईचाकूर

इमेज
भारतीय संस्कृती ही भूतदया जोपासणारी संस्कृती आहे. आपल्या थोर संत, महात्म्यांनी सुध्दा वेगवेगळ्या प्रसंगातून, माध्यमातून हाच संदेश दिला आहे. त्यात भगवान श्रीकृष्ण असोत अथवा ससिक रक्षण करणारे आदुसेने कुत्र्यास का मारले म्हणून खेद व्यक्त करणारे चक्रधर स्वामी असोत किंवा "भूता परस्परे जो मैत्र जिवांचे म्हणनारे ज्ञानेश्वर महाराज अथवा कुत्र्याचे पोट नुसती पोळी खाल्ले तर दुखेल म्हणून तुपाची वाटी घेवून कुत्र्याच्या पाठीमागे धावणारे नामदेव महाराज असोत. भुतांचे पालन करा म्हणनारे संतश्रेष्ठ तुकोबाराय हे सर्वजन प्राणीमात्राचे संगोपन करण्याची शिकवण देतात.        या संताची शिकवण जोपासणारे गाव म्हणजे धाराशिव जिल्ह्यात उमरगा तालुक्यातील स्वता:ची वेगळी ओळख जोपासणारे 'नाईचाकूर'      नाईचाकूर हे गाव तसे पाहिले तर महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात व निजाम स्टेट मधील एक महत्वाचे गाव. या गावच्या नावाचा इतिहास हाच एका दंत कथेवर मोठा मनोरंजक आहे. 'नाई' या मुळच्या कन्नड शब्दाचा अर्थ कुत्रा असा होतो. म्हणजे कुत्राच्या नावाची ओळख जोपासणारे गाव म्हणजे नाईचाकूर. चाकूर...

मुलांनो तुमच्यासाठी.......

करोना विषाणू संसर्गामुळे शाळांना सुट्टया  लागल्याने पालकांनी ही याची काळजी घेऊन मुलांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. मुल घराबाहेर  म्हणजे समुहात खेळायला जाणे होते. यातून संसर्गजन्य स्थिती उदभवू नये.  मुलं दिवस भर घरात थांबून कंटाळवाणे होत असेल.   सुट्टीच्या कालावधीत नेहमी शिबिरे, विविध छंद वर्ग, शिबिरे, सहपरिवार सहली, संग्रहालये, प्रेक्षणीय ठिकाणे मुलांना दाखवणे असे नियोजन पालक करत असतील पण करोनाच्या संसर्गामुळे हे सर्व बंद केले. घराच्या बाहेर जायचे नाही म्हणून काय झाले आम्ही घरीच मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी अनेक कार्यक्रम/उपक्रम करून घेऊयात.   मुलांकडून अवांतर वाचन करून घेता येईल. तोचतोचपणा घालवण्यासाठी नेटवर मुबलक साहित्य  पीडीएफ च्या रूपात उपलब्ध आहे. अनेक गाजलेल्या कांदब-या, गूढकथा, प्रवास वर्णने, आत्मचरित्र, युद्ध कथा, तसेच अनुवादित साहित्य इ. प्रतिभावान लेखकांच्या  साहित्यांचा आस्वाद वाचकांना घेता येईल. छात्रप्रबोधन मासिकांचे दर्जेदार जुने अंक ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.   दररोज काही तरी लिहावे. आपले अनुभव...

२३ मार्च....!!! आज शहीद दिवस

इमेज
भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या जहाल क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या वेळी त्यांच्यासमवेत कटामध्ये सामील असलेले शिवकर्मा, जयदेव कपूर आणि अन्य सहकारी यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जन्मठेप झालेल्या या मंडळींना ती शिक्षा भोगण्यासाठी दुसर्‍या कारागृहात नेण्यात येणार होते. तेव्हा कारागृहातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांची शेवटची भेट घेण्याची त्यांना अनुमती दिली. त्या भेटीत जयदेव कपूर यांनी भगतसिंगांना विचारले, ‘‘तुम्हाला फाशी देण्याचे ठरले आहे. अशा वेळी, ऐन तारुण्यात, मृत्यूला सामोरे जातांना तुम्हाला वाईट वाटत नाही का ?’’ तेव्हा भगतसिंग हसून म्हणाले, ‘‘अरे ! माझ्या प्राणांच्या बदल्यात ‘इन्कलाब झिंदाबाद’ ही घोषणा हिंदुस्थानच्या कानाकोपर्‍यात पोहोचवण्यात मी यशस्वी झालो आहे आणि हेच मी माझ्या प्राणांचे मूल्य समजतो. आज गजाआड असलेल्या माझ्या लक्षावधी बांधवांच्या तोंडून मी हीच घोषणा ऐकत आहे. इतक्या लहान वयात याहून अधिक मूल्य कोणते असू शकते ?’’ त्यांच्या तेजस्वी वाणीने सर्वांचेच डोळे पाणावले. त्यांनी कसेबसे हुंदके आवरले. तेव्हा त्यांच...

जनकल्याण निवासी विद्यालयाचे संगीत परिक्षेत घवघवीत यश

इमेज
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेमध्ये जनकल्याण निवासी विद्यालयातील १३३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.   प्रारंभिक परिक्षेत ११ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर प्रवेशिका प्रथम परिक्षेत २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रवेशिका पुर्ण परिक्षेत १विशेष प्राविण्यासह तर प्रथम श्रेणीत४१तर १७ विद्यार्थी द्वितीय  श्रेणीत उत्तीर्ण झाले.या विद्यार्थ्यांना हनुमंत पांचाळ सर यांनी शिक्षण दिले.  या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाच्या वतीने प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचूरकर, प्रकल्प कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशराव सेलूकर,वसतीगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे ,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के , प्रशासकीय अधिकारी  रविंद्र पुर्णपात्रे,अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी,शिक्षक,पर्यवेक्षक यांनी केले.

जागतिक मराठी भाषा दिन

इमेज
२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे. हाच दिवस मराठी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यासाठी मराठी अकादमी ने पुढाकार घेतला. कुसुमाग्रजांचे विपुल साहित्य आहे. याचाच गौरव म्हणून आहे.   जगातील अनेक भाषेचा जन्म हा संस्कृत भाषेपासून झाला आहे. आपली मराठी भाषा देखिल संस्कृत भाषेमधून निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेला मराठी मायबोली वाटते.  मराठी भाषा एकच आहे पण दर बारा कोसावर भाषेत बोलण्याची पद्धत वेगळी जानवते. मराठवाड्यातील वेगळी, कोकणातील कोकणी, खानदेश तील आयराणी तसेच जिल्हा जिल्ह्यातील भाषेत बदल दिसतो.     पण आता शालेय अभ्यासक्रमात जसे सेमी माध्यमातून अर्ध्य  इंग्रजी व अर्ध्य मराठी या प्रमाणे मराठी भाषेचे होत आहे. बोली भाषेत सुध्दा इंग्रजी, हिंदी शब्दाचा वापर वाढला आहे.  समाजमाध्यमावर संवाद करताना इंग्रजीतून मराठी बोलली जाते. तेही अर्ध्यवट शब्दाचा वापर केला जात आहे.  मराठी भाषिक प्रांतात मराठी बोला, लिहा चळवळ काढावी लागते या पेक्षा दूरभाग्य काय असु शकते. अन्य भाषा नक...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक व्हा.- शिवराज ढोलगे

इमेज
हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयात शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.  व्यासपीठावर बाल शिवाजी वेशात समर्थ भिसे तर राष्ट्रमाता जिजाऊ रूपाने गायत्री शेळके तर प्रमुख वक्ते शिवराज ढोलगे होते.  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवराज ढोलगे म्हणाले, विद्यार्थी मित्रानो, महाराजा सारखी दाडी वाढवण्यापेक्षा विचार वाढवा. शिवचरित्र, अभ्यासून महाराजांच्या काही गुणांचे अनुकरण करा असे मत मांडले.  यावेळी मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक, पर्यवेक्षक, शिक्षक आदि ची उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर कद्रे यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन ९वी ब ने केले होते.

विद्यार्थी मित्रांनो प्रशासकीय यंत्रणेत जा- जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे

इमेज
हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयाच्या वार्षिकोत्सवातील कलाविष्कार कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे बोलत होते की, प्रशासकीय यंत्रणेत काम करण्यासाठी अभ्यास करून मोठे व्हा.तसेच विविध कलागुणांना व्यासपीठ मिळवून देवून जोपासना केली पाहिजे आणि जनकल्याण विद्यालयाने सांस्कृतिक कलाविष्कारात वेगळे पण निर्माण केले आहे म्हणत कौतुक  केले.  व्यासपीठावर विनोदवीर बालाजी सुळ,प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेश सुगरे, वार्षिकोत्सव प्रमुख रघुनाथ पाटील उपस्थित होते.   महाराष्ट्राचा विनोदवीर बालाजी सुळ यांनी मनोगत व्यक्त केले.  सांस्कृतिक कार्यक्रमात विविध प्रकारच्या ११ कला प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रघुनाथ पाटील, हनुमंत पांचाळ, नरसिंग सुरवसे,विद्या कुलकर्णी, अपर्णाताई  शिलवंत , प्रदिप मुसांडे यांनी प्रयत्न केले.  कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विविध ११ कला प्रकार सादर करण्यात आले.कलाविष्कार मधील मर्द मराठा गीतावरील नृत्य,...

व्हॅलेंटाईन डे चे सत्य

इमेज
अनेक वर्षांपासून शाळा, महाविद्यालयीन युवक -युवती मोठा प्रमाणात हा दिवस साजरा करण्यात धन्यता मानतात. आपल्याला प्रिय वाटणा-या व्यक्ति ला गुलाबाचे फुल देऊन  त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा करतात. पण वास्तव वेगळेच आहे. काही वर्षांपूर्वी दैनिकात वाचनात आले होते.    ही गोष्ट रोमन साम्राज्य होते त्या वेळची आहे. त्या काळी रोमन सैनिक जगातील विविध देशात युध्दासाठी जात असत. यामुळे सैनिकाचे लग्न होत नसत. युवक सैनिक असल्यामुळे लग्न होणे कठीण होत असे. काही सैनिक अस्वस्थ होत आणि वाईट मार्गाला लागत होते. ही बाब व्हॅलेंटाईन नावाच्या धर्म गुरूच्या लक्षात आले. अशा अनुरूप मुलीच्या शोध घेऊन अशा सैनिकांचे लग्ने जमवून दिली. हे सैनिक कुटुंबे सुखी राहू लागले. म्हणून अशा जोडप्यांनी व्हॅलेंटाईन यांचा जन्मदिन 'सेंट व्हॅलेंटाईन ' म्हणून साजरा करू लागले.   या दिवशी आपल्या जोडप्याला गुलाबाचे फुल देऊन साजरा केला जाणारा हा दिवस आजचे युवक साजरा करण्यात धन्यता मानत आहेत.   आजच्या युवा वर्गाने हा दिवस आपण कोणाच्या स्मरणार्थ करतोय.  हा दिवस का साजरा क...

समाजाची बांधिलकी जपून काम करणारे जनकल्याण निवासी विद्यालय-प्रांत संघचालक मधुकरराव जाधव

इमेज
हरंगुळ (बु) समाजाची बांधिलकी जपून काम करणारे हे जनकल्याण निवासी विद्यालय आहे. यातून तयार होणारे विद्यार्थी हे या राष्ट्राचा वैभव होऊन रोजगार न घेता रोजगार देणारे व्हा. येथील शिक्षणातून सक्षम, स्वालबनामधून  अहंकार, नैराश्य, दूर होते. तसेच संवेदनशील माणुस म्हणुन आपले व्यक्तीमत्त्व घडवण्याची व्यवस्था केली जाते असे जनकल्याण निवासी विद्यालयातील वार्षिकोत्सव समारोप कार्यक्रमात व्यक्त केले. जनकल्याण निवासी विद्यालयाच्या वार्षिकोत्सव समारोप कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी नॅचरल समुहाचे बी. बी. ठोंबरे, मुंबई चे माजी आयकर आयुक्त संतोष जी साहू, रा. स्व. संघाचे देवगिरी प्रांत संघचालक मधुकरराव जाधव(दाजी), प्रांत उपाध्यक्ष रमेशराव जोशी,   प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचूरकर, प्रकल्प कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, प्रशासकिय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधिक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी ,वार्षिकोत्सव प्रमुख रघुनाथ पाटील  उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना श्री ठोंबरे म्हणाले भारतीय शिक्षण देणारे हे विद्यालय आह...

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र जनकल्याण निवासी विद्यालय - सुरेशजी पाटील

इमेज
हरंगुळ(बु) जनकल्याण निवासी विद्यालयातील विविध कार्यक्रम, उपक्रमातून विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होत असतो. म्हणून येथे प्रविष्ट विद्यार्थी हा भाग्यवान आहे . असे प्रतिपादन वार्षिकोत्सव उद्घाटन प्रसंगी संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह सुरेश दादा पाटील यांनी केले.      जनकल्याण निवासी विद्यालयाचा २६वा वार्षिकोत्सव कार्यक्रमाच्या उदघाटन कार्यक्रमासाठी  व्यासपीठावर वार्षिकोत्सवाचे उदघाटक भांजीभाई पटेल(सरस्वती सॉ मिल, लातूर) पुणे जनता बॅक शाखा अधिकारी मनोजजी मेंडजोगी, जनकल्याण समिती प्रांत उपाध्यक्षा पद्माताई कुबेर, प्रमुख वक्ते सुरेश पाटील, प्रकल्पाध्यक्ष प्रकाशराव रायचूरकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पूर्णपात्रे, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी, वार्षिकोत्सव प्रमुख रघुनाथ पाटील होते.   यावेळी प्रमुख अतिथीं च्या हस्ते विज्ञान - चित्रकला , ग्रंथ, उपक्रम तसेच गणितीय खेळणी व रांगोळीतून गणिताच्या विविध गोष्टी चे रेखांकित केलेल्या प्रदर्शनी चे उदघाटन करण्यात आले.         विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श...

जनकल्याण निवासी विद्यालयात वार्षिकोत्सवाचे आयोजन

हरंगुळ(बु) येथील जनकल्याण निवासी विद्यालयाचा २६वा वार्षिकोत्सव येत्या ७,८व ९ फेब्रुवारी २०२० रोजी संपन्न होणार आहे. वार्षिकोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात चित्रकैला, विज्ञान, ग्रंथ तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध उपक्रम, व सेवा प्रकल्पाच्या प्रदर्शनीचे उदघाटन केले जाणार आहे.  ग्रामीण भागात खेळल्या जाणा-या  खेळांचे "खेळ यात्रा" म्हणून आयोजन केले आहे. काव्य संध्या, वक्तृत्व, कथाकथन, वर्गश:पद्य पाठांतर, कलाविष्कार कार्यक्रम अशा विविध  लक्षवेधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे     ७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९.००वा. वार्षिकोत्सवाचे उद्घाटन मा. श्री. भांजीभाई पटेल(सरस्वती सॉ मिलचे संचालक) यांच्या हस्ते होणार आहे. तर विद्यार्थ्यांना मा. श्री. सुरेशजी पाटील (कार्यवाह,संवेदना प्रकल्प,लातूर)मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विज्ञान मंडळ व चित्रकला मंडळाच्या वतीने "पर्यावरण जागृती " म्हणून चित्र प्रदर्शनी, ग्रंथ, विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध साहित्य निर्माण केलेले प्रदर्शनी उद्घाटन होणार आहे.  दुपारी ३:०० वाजता ग्रामीण भागात पूर्वी खेळल्या जाणाऱ्या  विवि...

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

इमेज
शि-वा-जी या तीन अक्षरातून अदम्य प्रेरणा साठवून ठेवता येते. राष्ट्राच्या संक्रमणावस्थेत, पराधीन कालखंडात या नावानेच आम्हाला परकिय आक्रमकांशी झुंजत स्वाधीनता मिळवण्यासाठी प्रेरणा दिली. शिवचरित्राची प्रेरणा केवळ महायुद्धात व राजकारणात उपयोगी पडेल असे नव्हे तर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ती मोलाची आहे, म्हणून जनकल्याण निवासी विद्यालय प्रतीवर्षी वर्ग ९वी ची सहल रायगडावर नियोजित असते. याला सहल न म्हणता 'मातृभूमि दर्शन' असा शब्द वापरला जातो. गत २० वर्षापासून २५ व २६ जानेवारी ला किल्ल्यावर मुक्कामी राहून प्रजासत्ताक दिन रायगडावर साजरा करण्याचे भाग्य मिळते.   दुर्ग रायगडावर जाण्यापुर्वी गडाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि केवळ मौजमजा नाही तर इतिहासाविषयी जिज्ञासा व प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी काही पुर्व योजना केल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी साहित्य वाचन, किल्यावर असलेल्या वास्तूची बारिक सारिक माहिती मिळवणे. किल्ल्याविषयी माहिती पट दाखविले जाते. विविध लेखकांनी रायगडावर लिहिलेली माहिती अभ्यासून किल्ल्यावर जाण्यासाठी तयार होतात.    दि. २४ जा...