पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठवाडा मुक्तीसंग्रामात नाईचाकूरचे योगदान

इमेज
१५ ऑगस्ट १९४७ ! भारताला स्वातंत्र्य मिळाले,पण हैदराबाद संस्थान मात्र अजूनही पारतंत्र्याच्या अंधकारात होते. परवशतेचा पाश अधिक घट्ट होऊ पाहत होता,पण मराठवाड्यातील जनतेने निजामाची जुलमी राजवट उखडून टाकली,त्यासाठी मोठा संघर्ष केला "रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?" या न्यायाने संघर्षामुळेच हैदराबादेवर तिरंगा फडकला,यात स्वातंत्र्यलढ्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील नाईचाकुर गावाचा सहभागही मोलाचा होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी हैद्राबाद संस्थानात निजामी जुलमी राजवट होती. त्यांनी हिंदूवर अनंत अत्याचार केले जात होते. निजामाने आपल्या अत्याचारांसाठी वापर केला. तो 'इत्तेहादुल मुसलमीन' संघटनेचा कासिम रझवी याने या अंतर्गत 'रझाकार' नावाची संघटना काढली. ही निमलष्करी संघटना होती. सैनिकी वेश परिधान करून धारदार फावडे हातात घेऊन रझाकार फिरायचे. मुलींची अब्रु असुरक्षित झाली होती. बलात्कार करणे, एकटयास गाठून हत्या इत्यादी कृत्य रझाकार करत होते. अशा या जुलमी रझाकार संघटेनेचा प्रमुख कासिम रझवी होता. एकार्थाने तो हिंदूंचा कर्दनकाळच म्हणावा लागेल. धर्माच्या नावाखाली चालणा...

*आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक*

इमेज
आपण जेव्हा भारताच्या इतिहासाची पाने उलटतो तेव्हा इतिहासाच्या अंधार्या गुहेतुन उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या शौर्याची प्रखर किरणे दिसतात.    देशावर इंग्रजांची जुलमी राजवट होती साधनसंपत्तीची लूट ,जबरदस्तीने धर्मांतर यामुळे त्रस्त झालेल्या रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सगळ्याच जाती-जमातींनी संघर्ष केला. या सर्वांमध्ये ब्रिटिश काळात क्रांतीची मशाल पेटवली ते आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांनी !   उमाजींचा जन्म पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी दि. ७ सप्टेंबर १७९९ रोजी रोजी झाला. दादोजी खोमणे आणि लक्ष्मीबाई हे त्यांचे आई-वडील होते. जेजुरीचे मल्हारी मार्तंड खंडोबा हे उमाजी नाईक यांचे आराध्य दैवत होते . याच ठिकाणावरून त्यांनी इंग्रजांविरुद्ध क्रांतीचा वणवा पेटवला.   १८२१ साली झालेल्या रामोशी समाजाचा इंग्रजांविरुद्ध पहिला उठाव होता. या लढ्याचे नेतृत्व उमाजीनी केले. देशव्यापी क्रांतीचे स्वप्न पाहणारा इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतीकारक म्हणजेच उमाजी नाईक.  महाराष्ट्रातील रामोशी समाजाची वस्ती ही डो...

हिंदुनृपती श्री शाहूछत्रपती

इमेज
अखंड हिंदुस्थानचे हिंदुपदपातशाह, हिंदवी स्वराज्याचे हिंदवी साम्राज्यात रुपांतर करणारे छत्रपती शाहू महाराज! छ.शंभुराजांचे सुपुत्र शाहूंचा जन्म महाराणी येसूबाई यांच्या पोटी 18 मे 1682 रोजी रायगड जिल्ह्यातील गांगवली येथे झाला. त्यांचे मूळ नाव "शिवाजी" असेच होते.  त्यांचे बालपण रायगड किल्ल्यावर फुलत होते. मुगल बादशाह औरंगजेब आपल्या प्रचंड सैन्यानिशी दक्षिणेत आला. दक्षिणेतील हिंदवी स्वराज्य नष्ट करण्याचा त्याचा हेतू होता.हिंदुंचे स्वराज्य जिंकण्यासाठी आपल्या सर्वशक्तीनिशी औरंगजेब स्वराज्यातील किल्ले ताब्यात घेण्यासाठी धडपडत होता. औरंगजेबाशी मोठ्या आत्मविश्वासाने छत्रपती शंभुराजे संघर्ष करत होते.पण फितुरीने ते संगमेश्वर येथे मुघलांच्या हाती लागले. शेख निजाम उर्फ मुकर्रबखान याने संगमेश्वरावर छापा घालुन शंभुराजांना कैद केले. छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत हालहाल करुन औरंगजेबाने हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर झुल्फिकारखान उर्फ इतिकादखान याने रायगडाला वेढा दिला होता.अखेर महाराणी येसूबाई यांना राजपुत्र बाल शाहू यांच्यासह कैद झाली.सुमारे 17 वर्षे मोगलांच्या न...

नविन प्रवेश

*नवीन प्रवेश    नवीन प्रवेश    नवीन प्रवेश*        *रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित जनकल्याण निवासी विद्यालय हा सामाजिक शैक्षणिक प्रकल्प आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी. त्यांना संस्कारक्षम शिक्षण मिळावे या उद्देशाने कार्यरत आहे.*   *माफक शुल्कात समाज दातृत्वाच्या आधारे ९.५ एकरच्या निसर्गरम्य परिसरात हरंगुळ बु लातूर येथे प्रकल्प स्थित असून प्रकल्प संकुलात  विद्यालय, वसतिगृह व वसतिगृह कर्मचारी निवास अशी व्यवस्था आहे.*    *विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय व वसतिगृहात वेगवेगळे कार्यक्रम- उपक्रम प्रशिक्षण यांचे आयोजन केलेले असते.*  *वर्गात व निवासात  मर्यादित विद्यार्थी संख्या, वसतिगृहात स्वतंत्र अशी पालक पर्यवेक्षक व्यवस्था व स्वयंअध्ययन रचना असते.* https://forms.gle/3Bq2CYo2SpHX67X17

आत्मउमेदीची गुढी || 💐 -प्रवीण दवणे

इमेज
|| आत्मउमेदीची गुढी || 💐                                                    -प्रवीण दवणे          यंदाची गुढी  ही आत्मउमेदीचे, वर्तमानाचे आव्हान आम्ही पेलणारच ह्या अजिंक्य मानसिकतेचे प्रतीक असणार आहे.        चेहेऱ्यावर  सणासुदीचा आनंद सहज दिसण्याला आता  'मास्क 'चा आडपडदा  असणार आहे.   हर्षाने उल्हसित, स्वागतयात्रा काढणाऱ्या लेझिम नि जयघोषात नाचतगात निघालेल्या  तरुणाईला गॅलरीतून बघण्याची ओढ  गुढीलाही लागलेली असते. मधुर गाठयांची नि गेंदेदार हळदी झेंडूची माळ, गर्भरेशमी  वस्त्राबरोबर ,  सजण्याची  नि मिरवण्याची मिरास यंदा नाही. हे सगळं खरंय, पण सकारात्मक  ऊर्जेचे ,विश्वात्मक प्रार्थनेचे बळच तिमिराला दूर सारून जिंकते. या एकात्मक मनांचे प्रतीक म्हणून यंदाची गुढी  आपण उभारायची आहे.            प्रार्थनेत एक सुमंगल बळ असतं. यंदा ज...

*धर्मवीर शंभुराजे हत्या,गुढीपाडवा आणी औरंग्या*

इमेज
*मुळात गिढिपाडव्याचा शंभुहत्येशी काडिमात्र संबंध नाही गुढिपाडवा हा त्याही आधिपासुन सुरु आहे पण काही अज्ञानी फालतु लोक तो शंभुहत्येशी जोडता* सविस्तर👇👇👇 धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजे व त्यांची हत्या - आक्षेप नि खंडण "इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे. इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे आणि इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे." प्राचार्य शिवाजीराव भोसले सध्या महाराष्ट्रात जातीय अस्मिता जन्मांस घालून त्यांस खतपाणी घालण्याचे काम हेतुपुरस्सर केलं जातंय. त्यासाठी इतिहासाचं विकृतीकरण करून हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा एक बालिश प्रयत्न सुरु आहे. आपल्या समाजाची जी श्रद्धास्थाने असतात त्यांविषयी मनांत संभ्रम निर्माण करणे हा देखील त्यातलाच एक प्रकार ! असंच एक उदाहरण म्हणजे धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजे व त्यांची फाल्गुन वद्य अमावस्येला औरंगजेबाने केलेली निर्घृण हत्या, जिचा संबंध अकारण गुढीपाडव्यासारख्या मंगलमय सणाशी जोडला जाऊन समाजात बुद्धिभेद करण्याचा व जातीवाद पसरविण्याचा प्रयत्न केला जातोय ! त्यास आम्ही दिलेले हे प्रत्युत्तर !!! मुख्य आक्षेप व आरोप म्...

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे

इमेज
हरंगुळ येथील जनकल्याण निवासी विद्यालयात 'लेखक आपल्या भेटीला' या उपक्रमा अंतर्गत  हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शुद्ध भाषेतून व्यक्तीमत्व घडते. जिज्ञासा निर्माण होते. यातून मानवाची प्रगती होते असे बोलत होते.   यावेळी प्रकल्प अध्यक्ष प्रकाशजी  रायचूरकर, कार्यवाह मधुकर कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षका शर्मिष्ठा कुलकर्णी  उपस्थित होते.  डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांचा इ. ७वी च्या हिंदी पुस्तकात 'शब्द संपदा' हा पाठ अभ्यासक्रमात आहे. लेखक भेटीस आल्याने विद्यार्थ्यामध्ये आनंदी व उत्साही होते. यावेळी ७वी वर्गातील विद्यार्थ्यांनी  १.आपके जीवन का सबसे कठिन प्रसंग कौन - सा रहा है ।  २.क्या आपने बचपन से ही लेखक बनने का सपना देखा था ।  ३.आपको  लेखक बनने की प्रेरणा कैसे मिली  ४.अधिक से अधिक विद्या अर्जित करने के लिए हमें कौन - कौनसे प्रयत्न करने चाहिए । ५.शब्दों के संसार को आपने विचित्र क्यों कहा है । प्रश्न विचारले. य...

महाराजसाहेब शाहजीराजे

इमेज
   अखंड हिंदूस्थानातील हिंदू समाज शेकडो वर्षे स्वाभिमान हरवून बसला होता. या समाजातील युवकांच्या मनगटातील बळ निघून गेले होते. या युवकांना ज्यांनी सारं काही पुन्हा मिळवून दिलं. महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली असे राजे म्हणजे म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराज !!  शिवाजीमहाराजांच्या पाठीमागे समर्थपणे उभे राहून राष्ट्रीय भावना पेरणारे आणि स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणजे त्यांचे पिताश्री महाराजसाहेब शाहजीराजे!!  स्वराज्य संकल्पक शाहजी महाराजांचा जीवन प्रवास म्हणजे एक धगधगते यज्ञकुंडच.15 व्या शतकामध्ये संपूर्ण भारतभूमीवर परकीयांचे राज्य होते. दिल्लीमधून राज्य करणारे मुघल हे दक्षिणेतील प्रमुख सत्ताकेंद्र होते. याच बरोबर आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या मुस्लिम राजवटी राज्य करत होत्या. संपूर्ण भारतभर मुसलमानांचे राज्य असले तरीही त्यांच्यात कमालीचे वैर होतेच.त्याला शिया-सुन्नी वादाचाही किनार होती. यांच्यात सतत दुसऱ्यांचा प्रदेश घेण्याचे मनसुबे केले जात.या सत्ता संघर्षात बळी जायचा इथल्या हिंदुंचा!! या भूमीचे खरे मालक...