सामाजिक भान देणारी शाळा
रविवार, २५ मार्च २०१२ जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ बुद्रुक, लातूर लातूर-किल्लारी परिसरात ३० सप्टेंबर, १९९३ रोजी झालेल्या भूकंपानंतर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या जनकल्याण समितीने ‘जनकल्याण निवासी विद्यालया’ची स्थापना केली. लातूरजवळील हरंगुळ येथील साडेनऊ एकर जमिनीवर वसलेला हा प्रयोग म्हणजे ‘चलो जलाएँ दीप वहाँ, जहाँ अभीभी अंधेरा है’ या पंक्तींप्रमाणे ग्रामीण, शेतकरी, निम्नमध्यमवर्गीय, उपेक्षित समाजघटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देणारा शैक्षणिक प्रकल्प आहे. या शाळेत साधारण गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शिक्षक-पर्यवेक्षकांच्या सहकार्याने तो उत्तम गुणवत्ता प्राप्त करतो असा अनुभव आहे. आपल्याकडे शाळांमधून साचेबद्ध शिक्षण दिले जाते. या पाश्र्वभूमीवर जनकल्याण निवासी विद्यालयाची शाळा अनोखी शाळा ठरते. क्रमिक शैक्षिणक विकासासह चारित्र्य, सुसंस्कार, सदाचार, साहस, राष्ट्रभक्ती आदी गुणांचा विकास मुलांमध्ये व्हावा असा प्रयत्न केला जातो. त्यासाठी पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत सुव्यवस्थित दिनचर्या रचण्यात आली आहे. विनोबा भावे म्हणत ‘प्रत्येक शाळेत घर घुसावे ...